आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यातील IT कंपनी रातोरात बंद, ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर बेरोजगार

शरद लाटे  163   31-05-2026 17:45:07

Pune - 

 

पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-२ मधील 'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' (Think Technology India) ही आयटी कंपनी अचानक रातोरात बंद झाली आहे.

 

थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे, तब्बल ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

 

पगार थकवला, चेक्सही झाले बाऊन्स!

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवत होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने जे Cheques दिले होते, ते देखील बँकेत बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. पुण्यातील शेकडो इंजिनिअर एका रात्री बेरोजगार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

लॅपटॉपच्या नावाखाली घेतलेली 'सिक्युरिटी डिपॉझिट'ही लाटली

 

कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेकडो तरुणांना बसला आहे. नोकरीवर रुजू करून घेताना कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी १५,००० रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit) घेतली होती. ही रक्कमही परत न करता कंपनीने थेट गाशा गुंडाळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन मंदीच्या काळात ७०० आयटी कर्मचाऱ्यांची नोकरी अचानक गेल्याने पुण्याच्या आयटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.