नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात ‘विकसित भारता’चा पाया रचला गेला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘कमळ’ रुजले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. आज काळेवाडी, पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
'कमळ' हे केवळ भाजपाचे चिन्ह नाही, तर आपल्या राष्ट्रीय विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांचा कार्यकाळ हा खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या पायाभरणीचा काळ असल्याचे अधोरेखित करत, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात 'कमळ' रुजले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'संकल्प से सिद्धी तक' या सूत्रावर आधारित गेल्या ११ वर्षांत केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा आढावा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अधिक मजबूत करू आणि 'विकसित भारता'च्या निर्मितीत आपले योगदान देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण,श्री प्रदेश महासचिव आ.श्री विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, प्रदेश महामंत्री श्री राजेश पांडे, संघटन मंत्री श्री रवि अनासपुरे, संघटन मंत्री श्री मकरंद देशपांडे, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे श्री योगेश पाचल यांसह पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष,मंडल अध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.