आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नांदेड

Modi government 11 years पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच परराष्ट्रात देशाची मान उंचावली गेली - शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

शरद लाटे  392   14-06-2025 19:16:14

चिंचवड प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर त्यांनी 26 मे 2014 रोजी सूत्रे हाती घेतली होती. पीएम मोदी यांनी त्यांच्या या 11 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थपित केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांची ही 11 वर्षांची कारकीर्द अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात अनेक सकारात्मक बदल घडवण्याचा एक व्यापक प्रयत्न केला आहे.

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेला, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, आजी माजी पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे म्हणाले की; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली

मजबूत नेतृत्व आणि लोकप्रभाव असलेले नेतृत्व देशाला मिळाले

पीएम मोदी यांची सामान्य जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली अनेकांना भावली आहे. त्यामुळेच गेल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत भाषणकौशल्य आणि कार्यशक्तीमुळे लोकांमध्ये त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. त्याचा फायदा त्यांना आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत झाला आहे. त्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करता आली आहे. 2014 पासून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभासोबतच अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत.

भाजप अन् संघटनशक्ती :

भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंघटनेचा मजबूत आधार राहिला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने मोदींनी संपूर्ण देशभरात भाजपचे संघटन प्रभावी केले आहे. बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचे नेटवर्क त्यांनी उभे केले आहे. या नेटवर्कचा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने भाजपचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विकासाचे आश्वासन आणि गरिबांपर्यंत पोहोच

पीएम नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधणी, जनधन योजना यामुळे ग्रामीण आणि शहरी गरीब वर्गाचा विश्वास मिळवला आहे. त्याचा प्रत्येक निवडणुकीत त्यांना फायदाच झाला आहे. विशेषतः महिलांमध्ये त्यांनी राबवलेल्या योजना अधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

राष्ट्रहित आणि सुरक्षा

पीएम मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर, कलम 370 हटवणे, तीन तलाक विरोधी कायदा, सीएए या निर्णयांनी पारंपरिक हिंदू मतदार अधिक दृढ झाले. त्याचा फायदा त्यांना आतापर्यंतच्या निवडणुकीत झाला आहे. त्यासोबतच राष्ट्रहित आणि सुरक्षा हे मुद्दे लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करतात.

विकासाभिमुख धोरण:

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या उपक्रमांनी देशात नव्या घडामोडींना चालना दिली. उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनांनी सामान्य जनतेच्या जीवनात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने केला.

परराष्ट्र धोरण:

जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. विविध देशांशी मजबूत संबंध प्रस्थापित करण्यात आले. संरक्षण आणि सुरक्षेचा विचार करता त्यांनी सर्जिकल स्ट्राईक (२०१६) आणि बालाकोट एअर स्ट्राईक (2019) या घटकांमुळे भारताने आपली संरक्षणक्षमता दाखवून दिली.

महत्त्वाचे निर्णय :

गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), तीन तलाक विरोधी कायदा, राम मंदिर वादाचा निकाल आणि मंदिर बांधकामास सुरुवात करीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पीएम नरेंद्र मोदी यांचा राजकीय पाया फक्त त्यांच्या लोकप्रियतेवर नाही, तर संघटीत पक्ष यंत्रणा, स्पष्ट विचारसरणी, जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या योजना, आणि कमजोर विरोधी पक्ष यावर आधारित आहे. त्यामुळे ते आजही देशातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत असे देखील पत्रकार परिषदेमध्ये काटे म्हणाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.