आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 भंडारा

केस पोलिसांनी तीन तास टाईमपासच केला; नाहीतर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता; शिवराजच्या जबाबाने महाराष्ट्र हादरला!

शरद लाटे  133   29-03-2025 14:05:19

Beed (Sarpanch Deshmukh murder) 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करुन हत्या केली होती. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.शिवराज देशमुखांचा मोठा खुलासा

 

 

संतोष देशमुख यांची गाडी शिवराज देशमुख चालवत होते. अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख हे लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन महाजन आणि बनसोडे साहेब यांना संपूर्ण हकीकतही पोलिसांना सांगितली. परंतु पोलिसांनी मला तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवलं. पोलीस कर्मचारी म्हणू लागले की फिर्याद दमानी लिहावी लागते. तसेच कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावे लागते असे म्हणत होते त्यामुळे फिर्याद देण्याकरता बराच वेळ लागला, असं शिवराज देशमुख यांनी जवाबात म्हटलं आहे.

कोयत्याने शिवराज देशमुखला धमकावलं

शिवराज देशमुख संतोष देशमुख यांच्यासोबत जात असताना उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्राईवर साईटच्या काचेवर दगड सुधीर सांगळे याने मारला होता. दगड मारून संतोष देशमुख यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यावेळी शिवराज देशमुख यांना मारहाण केली गेली. जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.